Showing posts with label --- मंगेश पांडगावकर. Show all posts
Showing posts with label --- मंगेश पांडगावकर. Show all posts

Wednesday, March 9, 2011

गझल--

२८

भीती धरू कशाला जर जायचेच आहे
या मातिच्या घरांना विसरायचेच आहे

काळोख पाहताना हलली न पापणी ही
हे गीत एकटयाने मज गायचेच आहे

मृत्यूसमोर माझ्या मी वेचिली फुले ही
घेऊन माळ माझी मज यायचेच आहे

हे माग पावलांचे पुसतील पार लाटा
तेव्हा विनाकिनारा मज व्हायचेच आहे

--मंगेश पाडगांवकर

माझ्याच भावनांना मज जाळता न येते
माझ्याच वेदनांना मज टाळता न येते

असुनी अभाव सारा हे स्वप्न पाहतो मी
तुडवीत या फुलांना मज चालता न येते

संपेल मार्ग तेथे काळोख किर्र आहे
तरिही मलाच बेडी मज घालता न येते

बहिरे उभे सभोती हे वाजवीत टाळ्या
माझ्या उरात गाणे मज कोंडता न येते

ही रीत या जगाची अन वेगळीच भाषा
समजूत आसवांची मज काढता न येते

ही सांज काजळे अन बुडती तमात झाडे
प्राणातली उदासी मज टाकता न येते

--मंगेश पाडगांवकर

४७

निरोप घेताना डोळ्यांत आसवे आणणार नाही
जिवाच्या पाखरा पिंज-यात तुला कोंडणार नाही

कोसळली सर अंगावर माझ्या माझ्याचसाठी
पुन्हा वृष्टीसाठी लाचार मागणे मागणार नाही

पक्षी अचानक सांगत गूज झाडावर आला
उडून जाताना फांदीवर आशा टांगणार नाही

हळू बिलगले पाण्याला चांदणे उत्तररात्री
चंद्र बुडताना खोटे गहिवर काढणार नाही

कोवळ्या क्षणांची फूलपाखरे तुझ्यामुळे झाली
हाव-या हातांनी पंख तयांचे खुडणार नाही

प्रत्येक फुलाच्या धुंद कहाणीला शेवट असतो
पुस्तकातल्या सुकल्या फुलांना शापणार नाही

--मंगेश पाडगांवकर

४८

ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले
उधळून प्राण माझे देता मला न आले

होते गळ्यात गाणे पण श्वास कोंडलेला
माझेच सूर तेव्हा गाता मला न आले

डोळ्यांत पाहिले मी आभाळ भारलेले
हे पंख कापलेले : उडता मला न आले

झोकून देत सारे आल्या उधाणलाटा
मी कोरडा किनारा, भिजता मला न आले

हे रान मोर झाले बेहोष नाचणारा
आषाढ झेलुनी तो फुलता मला न आले

जे मोजता न येते केला हिशोब त्याचा
होतो जिवंत तरिही जगता मला न आले

--मंगेश पाडगांवकर

Sunday, July 5, 2009

खाली डोकं वर पाय...

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?

खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?

खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?

खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?

खाली डोकं, वर पाय !

- मंगेश पाडगावकर

तुमच काय गेल?

त्याने प्रेम केल किन्व्वा तीने प्रेम केल
करु दे कि !
मला सान्गा तुमचे काय गेल ?

तो तीला एकान्तात बागेमध्ये भेटला
नको तीतक्या जवळ जाउन खेटला
लाल लाल गुलाबाचे फ़ुल होवुन पेटला
भेटला तर भेटु दे कि, पेटला तर पेटु दे कि !
तुमच डोक कशासाठी इतका गरम झाल
त्याने प्रेम केल किन्वा तीने प्रेम केल
करु दे कि !
मला सान्गा तुमच काय गेल ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशि झाली
पाउस होता तरि भिजत त्याच्या घरी गेली
घरात तेन्वा कोनी नवते म्हणून त्याचे फ़ावल
त्याने तीला जवळ घेउन चक्क दार लावल
लावल तर लावु दे कि फ़वल तर फ़ावु दे कि
तुमच्या आमच्या पुर्वजान्नी आन्खी काय केल?
त्याने प्रेम केल किन्व्वा तीने प्रेम केल
करु दे कि !
मला सान्गा तुमचे काय गेल ?

घरात जागा नसते त्यान्च्या चालनारच ट्याक्शित प्रकरन
ते थोडेच बसनार अहेत पनिनिचे घोकत व्याकरण
गुलाबी थन्डिचे परिणाम हे होनारच
कुनीतरी कोनाला जवळ ओढून घेनारच
घेतले तर घेउ दे कि व्हायचे ते होवु दे कि
तुमच्या घरच बोचके त्याने थोडच उचलून नेल
त्याने प्रेम केल किन्व्वा तीने प्रेम केल
करु दे कि !
मला सान्गा तुमचे काय गेल ?

Friday, July 3, 2009

प्रेम म्हणजे प्रेम असत....

प्रेम म्हणजे प्रेम असत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

--- मंगेश पांडगावकर

विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही...

विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही
मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही
विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही

झुरते बन माडांचे, आणि शुक्रतारा
भरतीचे स्वप्न बघत, विकल का किनारा
रंग रंग विरले रे, खिन्न दिशा दाही

सांजवेळ, संथ डोह, हाक जीवघेणी
शब्दाविण डोळ्यांनी, वाचिली कहाणी
तो वेडा स्पर्श काय, छळिल रे तुलाही

का, चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दवहळवे, गीत तुझ्यासाठी
सूरसूर बुडले रे, अदय या प्रवाही

सूर मनांतिल कधिही, आणु नये ओठी
लावु नये जीव असा, कधिच कुणासाठी
निर्माल्यच ये करात, गंध उडुन जाई

पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे
पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे
चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही

--- मंगेश पांडगावकर

ते दान त्या क्षणाचे

ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले
उधळून प्राण माझे देता मला न आले

होते गळ्यात गाणे पण श्वास कोंडलेला
माझेच सूर तेव्हा गाता मला न आले

डोळ्यांत पाहिले मी आभाळ भारलेले
हे पंख कापलेले : उडता मला न आले

झोकून देत सारे आल्या उधाणलाटा
मी कोरडा किनारा, भिजता मला न आले

हे रान मोर झाले बेहोष नाचणारा
आषाढ झेलुनी तो फुलता मला न आले

जे मोजता न येते केला हिशोब त्याचा
होतो जिवंत तरिही जगता मला न आले

--मंगेश पाडगांवकर

ते म्हणाले.........

ते म्हणाले चेहरे चुकवीत होतो
मी खरे तर आसवे लपवीत होतो

हासले ते पाहुनी मी वाकलेला
मुखवटे त्यांचेच मी जमवीत होतो

भासल्या या भ्याड त्यांना हालचाली
मी कळ्या कोमेजल्या फुलवीत होतो

बोलले ते भाकतो करुणा नभाची
पाखरे मी भाबडी उडवीत होतो

सांगती ते वागणे आले गळ्याशी
मी गळ्यातुन सूर हे रुजवीत होतो

-मंगेश पाडगांवकर

निरोप घेताना.........

निरोप घेताना डोळ्यांत आसवे आणणार नाही
जिवाच्या पाखरा पिंज-यात तुला कोंडणार नाही

कोसळली सर अंगावर माझ्या माझ्याचसाठी
पुन्हा वृष्टीसाठी लाचार मागणे मागणार नाही

पक्षी अचानक सांगत गूज झाडावर आला
उडून जाताना फांदीवर आशा टांगणार नाही

हळू बिलगले पाण्याला चांदणे उत्तररात्री
चंद्र बुडताना खोटे गहिवर काढणार नाही

कोवळ्या क्षणांची फूलपाखरे तुझ्यामुळे झाली
हाव-या हातांनी पंख तयांचे खुडणार नाही

प्रत्येक फुलाच्या धुंद कहाणीला शेवट असतो
पुस्तकातल्या सुकल्या फुलांना शापणार नाही

--मंगेश पाडगांवकर

भीती धरू कशाला ...

भीती धरू कशाला जर जायचेच आहे
या मातिच्या घरांना विसरायचेच आहे

काळोख पाहताना हलली न पापणी ही
हे गीत एकटयाने मज गायचेच आहे

मृत्यूसमोर माझ्या मी वेचिली फुले ही
घेऊन माळ माझी मज यायचेच आहे

हे माग पावलांचे पुसतील पार लाटा
तेव्हा विनाकिनारा मज व्हायचेच आहे

--मंगेश पाडगांवकर

डोळ्यांत सांजवेळी .......

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा ही माणसे शहाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला-मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकली विराणी

--मंगेश पाडगांवकर

..सुखाचे भलतेच वागणे ?

अवकाश भारलेला, प्राणांत चांदणे
दोघें अथांग आता संपून बोलणे

स्वप्नातल्या जळी या ही चंद्रकोर हाले
श्वासात श्वास आता गुंफून चालणे

पानांतुनी म्हणाले हलकेच फूल गाणे
नव्हतेच या क्षणांचे काहीच मागणे

कां पापण्यात आले दाटून सांग पाणी ?
कां हे असे सुखाचे भलतेच वागणे ?

--मंगेश पाडगांवकर

वाट होती आंधळी .....

वाट होती आंधळी अन भोवती अंधार होता
हात तू हाती दिला गS एक हा आधार होता

सोशिले तू सर्व काही वाट माझी चालताना
साहिले पायांत काटे हा तुझा शृंगार होता

वैर केले या जगाने घाव सारे घेतले तू
पापण्यांनी झेलला गS तूच हा संसार होता

बोललो नाही तरीही जाणतो मी आत सारे
चांदणे झालीस, माझे दैव हे अंगार होता

गीत गाता अंतरीचे गीत मी गातो तुझे गS
तू दिलेल्या रागिणीला कोवळा गंधार होता

--मंगेश पाडगांवकर

....माणूस शोधतो मी

कोलाहलात सा-या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो
भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी

हव्यास हा सुखाचा, कल्लोळ वासनांचा
जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी

फासून रंग रात्री दिवसा भकास सारे
खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी

काळ्या उभ्या तिजो-या गाणे खरीदणा-या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी

त्वेषात बाहुल्यांचे जाती जथे पुढे हे
कळसूत्र तोडुनी हे माणूस शोधतो मी

या झोपडयांत आली वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी

या संस्कॄतीस सा-या ही चूड लाविली मी
वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी

--मंगेश पाडगांवकर