जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा
आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
डॊळे मिटून घेतॊ छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थॊडा तरी इषारा?
नशीबास हा फ़ुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा?
Sunday, July 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment